अथांग सागरात फिरून यायला मनाला शरीराची गरज नसते
ते केव्हाही कुठही अलगद उडून जात फुलपाखरासारखं,
आभाळभर फिरायलाही त्याला पंखांची गरज नसते ,
थकत का कधी ते जाणवतच नाही
डोळ्यांच्या अबोल भावनांना ओठातल्या शब्दाची गरज नसते
त्यांची भाषा मूकपणे व्यक्त होते
प्रत्येकाचं आपापल एक वेगळ अस्तित्व तरीही एकमेकात गुंतलेले
त्या झाडाला बिलगून वाढणाऱ्या चिवट वेली सारखं
ती कितीही स्वतंत्रपणे वाढली तरी भावनांची गुंफण काही सुटत नाही
मग ते मन असो भावना असो वेदना असो वा शरीर असो...........
म्हणूनच माणूस परिपूर्ण म्हणवला जात असावा का ?
- सोनाली गाढवे देशमुख. दि. ०४ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
© सोनाली गाढवे देशमुख.

No comments:
Post a Comment