का कुणास ठाऊक , उन्हाशी पाठशिवणीचा खेळ खेळत संध्याकाळ उंबऱ्याशी येते
अन माझ्या जीवाला उगीचंच हुरहूर लागते ,
भीती असते का ती स्वप्नांच्या गावात हरवण्याची कि चांदण्यांच्या
अंगणातल्या खेळात चंद्राने
डोकावण्याची ,
कसली हि मनाची घालमेल, उगीचच लागलेली रुखरुख , कसली तरी भयाण पोकळी जाणवते खोलवर,
अन त्या सूर्याला ढळताना बघत धडधडणार काळीज ,
तो उद्या उगवेल माहित असूनही गांगरून
गेलेलं…। वेडं काळीज ...........
नकळत ओघळणारा अश्रुंचा थेंब , पापणी ओलावलेली जाणवतही नाही , जाणवत जेव्हा ओलावलेल्या गालाला
थंडगार झुळूक लगट करून जाते ,
अन नको होऊ दे संध्याकाळ असा वाटणारं वेडं मन ती संपायलाही
नको असा हट्ट करू लागतं ,
उगाचचं त्या एकांताची सोबत अशीच राहावी वाटते ,
तेही भीतीनेच का सावली हि सोडून
जाईल या विचारांनी?
कसलं हे मनाचं लाजीरवान वागणं सतत कुणाचीतरी अपेक्षा करणारं ,
जणू काही स्वताच अस्तित्वाचं
नाही मूळी त्याला,
मग पुन्हा कुठतरी नवीन अपेक्षा,
नवी चाहूल घ्यायची आस ,
खरे का खोटे पण पुन्हा तेच आभास
,
पावलांना तर आवरता येईल मनाला कसं आवरू ,
पावलं नाहीत भरकटणार पण मनाला
कसं सावरू ,
पुन्हा सगळी प्रश्न कोडी सोडवूनही हि निरुत्तरित झालेलं मन
कुठून सुरु अन कुठ संपतं त्याचा थांगपत्ताच नाही.
अन त्यातच झालेली रात्र , अंगणात पडलेला चांदण्यांचा डाव
अन संपलेली ती मंतरलेली संध्याकाळ नेहमीसारखीच नुसतीच
हुरुहूर लाऊन गेलेली उद्या पुन्हा येण्यासाठी
…
- सोनाली गाढवे देशमुख. दि. ३० जून २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
© सोनाली गाढवे देशमुख.