Tuesday 8 July 2014

हरवलेलं नातं


काही नाती अशीच असतात , रेशमी धाग्याला नकळत पडलेल्या गाठीसारखी 
ती गाठ कधी पडली विचार करता करता घट्ट  होत जाते न सोडवता येईपर्यंत 
ती गाठ तिथच तोडून दिली तरी धागा पुर्ववत होत नसतो , तो ताणतो अन विरळ होतो कायमचा  
नात्यांचही तसच …………… 

आपली वाटणारी माणसं गर्दीलत्या माणसात विरघळून जातात नकळत
नकळत होणारे गैरसमज आणि त्यामुळे नात्यांची विण घट्ट करता करता उसवत गेलेली ,उधसलेली खोलवर कुठतरी ………  
उसवलेले टाके पुन्हा घालता येतात का , आणि आलेच तरी पुन्हा न उधसण्या  इतपत तर नक्कीच नाही ना 
मग ते आत आत उसवलेलं असच घेऊन जगायचं , 
ते उधसलेपण पापण्यात दडवायचं ओठात अडवायचं , 
मनातल्या कप्प्यात डांबून ठेवायचं अगदी खोल आणि कुणाला जाणवू हि नाही द्यायचं, विस्कटलेल कपाट सावरावं तसं सावरायचं कुणाला कळू नये म्हणून 
कसली अजब तारेवरची कसरत 
कारण एकच…  आपणच गुंतलेलो असतो त्या नात्यात ,आणि तो गुंता सोडवता सोडवता गुरफटत गेलेलो असतो , कदाचित आपलीच इच्छा नसते का बाहेर पडायची …… 
खरंच नाती पुन्हा नव्यानी विणता आली असती तर ……… आयुष्य ,जगणं सोप्पं झालं असतं का ?


सोनाली गाढवे देशमुख. दि. ०८ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.